Thursday, 24 October 2013

Maitri...............................

सध्या सध्या गोष्टीतून आणि घटनांमधून आपण माणस जोडत जातो . त्या घटना कालांतराने कालबाह्य ठरतात पण त्यामुळे जोडलेली माणस मात्र चिरकाळ आपल्या हृदयात घर करून बसतात . ……सहज एखादा माणूस प्रवासात भेटतो आणि काही वेळा कायमचा आपला सहप्रवासी होतो हे काळातही नही .
   अनेक प्रवृत्तींच्या लोकांना एकत्र बांधणारा एक समान धागा असतो .कुटुंबात नाती तर समाजात मैत्री .  मैत्री   कोणताही लोभ ,अपेक्षा आणि जबाबदारी यांच्या शिवाय जगण्यातील केवळ निखळ आनंद मिळवून देणारे हे नाते . सुख आणि दु:ख दोन्ही प्रसंगात या नात्याची तीव्रता सारखीच . आपलेपणा ,प्रेम आणि सहवास यांचा सहज सुंदर मिलाफ असणारे हे नाते.
      या नात्याची गुंफण कधी होते ? …………………  जसा उमलणाऱ्या फुलाकडे एकटक पाहत राहिले तरी काळात नाही ते नेमके कधी फुलले ,तसच काहीस या नात्याचे . या नात्याच्या बंधनात आखीव रेखीव अस काहीच नसल तरी फक्त आनंदाची न दिसणारी चौकात मात्र असतेच .
      सतत आसपास असणारी आपली माणस (नातेवाईक ) किती तरी वेळा आपली वाटत नाहीत कडू गोड प्रसंगात त्या त्या नात्यात अंतर वाढत तरी किंवा कमी तरी होत पण शेकडो मैल दूर असो की अगदी जवळ असो मैत्रीच्या नात्यात काहीच  फरक पडत नाही ,असा माझा अनुभव आहे .
     प्रत्येक नात्यात असतात तसे रुसवे फुगवे याही नात्यात असतात पण त्याला न गर्वाची न द्वेषाची ना इतर कोणत्या षढ रीपुंची जोड  असते ,  असतो तो  केवळ  मित्रावरील प्रेमाचा हक्क . तू माझ्यासाठी हे कर मग मी तुझ्यासाठी हे करीन अशा व्यवहारिक बंधनात राहून तर हे नाते कधीच निर्माण करता येणे शक्य नाही ,एखादा छोटासा जरी स्वार्थ निर्माण झाला तरी कोणत्याही नात्याला तडा जातोच पण मित्रानो मैत्रीला तडा जाऊच शकत नाही कारण जेथे तडा गेला तेथे मैत्री कधीच अस्तित्वात नव्हती हे लक्षात घ्याव .
    मैत्रीला कोणतीच सीमा नाही , न वयाच ,काळ ना सामाजिकता न लिंगाचे कसलेच बंधन नाही ख़ऱ्या अर्थाने ते केवळ दोन किंवा अधिक माणसनामधल नात असत. भेद  आला की हे नात  तिथ कधी नव्हतच हे  समाजाव .
मित्र किती असावेत ……क़हि मर्यादा नाही ,कोन असावेत यालाही मर्यादा नाही ,मित्र आपल्याला निवडता येत नाही तो आपसूकच आपल्या जीवनात येतो . माझ्या १०वी च्या वर्गात ५० मुले होती आज त्यातील अगदी थोडे माझ्या सोबत आहेत आणि बाकीच्यांची नावे सुद्धा आठवत नाही .  जे आहेत ते माझ्या मैत्रीच्या धाग्यात .  एका वेळी अनेक क्षेत्रत आपली मैत्री असू शकते आणि ती तितकीच घट्ट हि असते , शाळेतले मित्र , मैदानावरील मित्र ,शेजारी तर काही सामाजिक कामातील केवळ याच नात्याची व्याप्ती विशाल आहे. माणस सहज कमावता येतात , सांभाळता येतात आणि जगता  येतात .
       तरी जर  कोणी एखादा भेटला आणि म्हणाला मला मित्र नाही …………… तर त्याक्षणी मनाची घालमेल होते  की अरे आज ही एक मनुष्यप्राणी तर ……………………………….
                                                                                          अद्वैत

Saturday, 26 January 2013




आठवणी ...............

हळुवार गोंजाराव अस वाटत असतानाच ...
मधेच का ग नियतीच नख लागावा ......
तू आहेस अस भासताना ..
तू का ग डोळ्यासमोर नसाव..
                 वाटा शोधताना ,का ग धुळीच वादळ व्हाव ..
                 अलगद डोळ्याची पापणी उघडताच ...
                 का ग आभाळ भरून यावं ..,
 मन कोसळत असताना , का ग आवाज होत नाही ...
ओघळणाऱ्या  आसवांच रहस्य तरी का ग ...?
आज ही तूला उलगडत नाही ....
                 क्षणा क्षणाला का ग मी आठवणीत जागाव ....
                 आणि तू मात्र , का ग आठवणीच सरण  रचाव ..
चल सरणावरती का होईना ,तू  त्या आठवणी ठेवाशील ना ?
माझ्या म्हणून तरी त्या शेवटी तू जाळशील  ना ..........?
                                                       अद्वैत